पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. हे नागरिक म्हणजे कंत्राटी परिचारक आणि परिचारिका होते. तसेच, मराठा आणि ओबीसी आंदोलकीदेखील यावेळी या जमावात होते. या सगळ्यांनी मिळून आपापल्या मागण्या घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
हे पण वाचा, “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
यावेळी, या जमावाने थेट उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, एवढेच नाही तर त्यांच्या गाडी समोर लोटांगण घातले. त्यामुळे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमार करावा लागला. तसेच, आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करावे लागले. दरम्यान, यावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, भाजपच्या नेत्यांनी देखील या घटनेचा निषेध करत, उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
हे पण वाचा, कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही, राऊतांना अजित पवारांनी सुनावलं
भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत या घडलेल्या प्रकारावरून उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून, “बीड मधे उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलाना काय वागणूक मिळाली बघा. अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मिडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे 10 सेकंड थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”, असा घणाघात त्यांनी केला आहे.
हे पण वाचा, बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा
यावर, आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, ““जे येतात त्या सर्वांना मी भेटत असतो. मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. ३० वर्षांपासून हेच करतोय. मी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काहीजण एकदम आडवे आले, आम्ही वेळ दिली होती, भेटा, चर्चा करा निवदेन द्या…चर्चेची तयारी आहे” असं सांगत त्यांनी, “ज्यांना काही उद्योग नाहीत ते अशी टीका करत असतात. टीका कोण करत आहे…म्हणजे ती व्यक्ती कोण आहे यावरुन त्या टीकेला महत्व असतं. त्यांच्या टीकेकडे कोण लक्ष देतं,” असा खोचक टोला लगावला आहे.
Read Also :
- “स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री
- “लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘राष्ट्रवादी’ मात्र कोरडे पाषाण”, राष्ट्रवादी भवनच्या उदघाटनाला तुफान गर्दी
- फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची – नारायण राणे
- भाई जगतापांनी बोलून दाखवली खंत, या आघाडीत काँग्रेस ‘तिसराच’
- ‘आम्ही तेवढ्या एकाच कारणासाठी महाविकास आघाडीत सामील’- काँग्रेस