मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर १ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढणार असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला होता. परंतु ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्तेचा प्रश्न असेल आणि त्या कारणासाठी आमच्या आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली जात असेल, आम्ही कोण आहोत? हा काय अतिरेक्यांचा मोर्चा आहे. या मुंबईतल्या नागरिकांचा मोर्चा आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण कायदा -सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांच्यामुळे कोसळली असल्याची टिका देखील राऊतांनी केली आहे.
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
दरम्यान, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने ठाकरे गटातील नेत्यांचं शिष्ठामंडळ पोलिस आयुक्तांच्या भेटीला गेले. यानंतर १ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग पोलिसांनी बदलला असल्याची माहिती समोर आली आहे. यातच आता हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते पालिका गेट क्रमांक दोन असा असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कालच्या प्रकरणावरून शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरूवात केली”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स…! ‘या’ प्रकरणात १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…पुण्यात दिवसा ढवळ्या तरूणीवर कोयत्याने हल्ला..! “गृहमंत्र्यांनाही बहुथा राजकीय..,” अजित पवारांचा घटनेवर संताप
हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा एक आदेश अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ‘१८’ नगरसेवक ‘सहा’ वर्षासाठी निलंबित
हेही वाचा…“टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर..” काॅंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा