मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरू झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरीया यांना अपात्र करण्यात यावे, अशा प्रकाराचं पत्र ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदारांनी सचिवांकडे दिले आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ, लवकरच होणार घोषणा
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी मनिषा कांयदे आणि विप्लव बजोरीया यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्याआधी या तिन्ही नेत्यांना अपात्र करा, अशी मागणी ठाकरे गटातील आमदारांनी सचिवांकडे केली आहे.
हेही वाचा…“अजित दादा दबंग नेता वगैरे काही नाही,” एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. आज सभागृहात जयंत पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे आमदार विरोधी बाकावर बसले. तर अजित पवार यांचे समर्थक आमदार सत्ताधारी बाकावर बसले होते. त्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी दिल्याने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…माढ्यात भाजपला डोकेदुखी, मोहिते पाटील विरुद्ध खासदार निंबाळकर वाद पेटणार? नेमकं काय घडलं?
हेही वाचा…मुंबई महापालिकेत २६३ कोटींचा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप, चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
हेही वाचा…देशात सत्ताधारीच्या बाजूने ३० तर विरोधी पक्षांकडून २४ पक्ष एकवटणार, बैठक सत्रांचं आयोजन
हेही वाचा…“विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांना निलंबित करा,” ठाकरे गटाच्या नेत्यांची मोठी मागणी
हेही वाचा…अजित पवाराचं बंड, शिंदे सरकारचं पावसाळी अधिवेशन, कोणी गाजवलं आजचा दिवस ?