मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं असून यावर काॅंग्रेसने दावा सांगितला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पुर्वी काॅंग्रेसच्या नेत्यांपैकी एकाची विरोधी पक्षनेते पदासाठी नवनियुक्त केलं जाऊ शकतं.
हेही वाचा…“राज्यात लवकरच काॅंग्रेसचं स्थिर सरकार येईल,” ‘या’ महिला आमदारानी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सुमारे ४ वर्षानंतर काॅंग्रेसकडे चालून येत आहे. या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी असून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन नेत्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच विरोधी पक्षनेतेपदासाठी तरूणाला संधी देण्याचा निर्णय झाला तर पुर्वी हे पद सांभाळलेले विजय वडेट्टीवार, डॉ. सुनील राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. हे तिघेही विदर्भातील असल्याने त्यांची नावे पुढे केली जात आहेत. कुणाल पाटील, संग्राम थोपडे, विश्वजित कदम यांचीही नाव काल चर्चेत होती.
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी
दरम्यान, अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजप अशा तिन्ही पक्षाचा पहिलाच पावसाळी अधिवेशन आहे. त्यामुळे विधानसभेत काय होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार आपली नातीगोती विसरून आमदारांच्या निलंबणाचा निर्णय घेतील”
हेही वाचा…“अजित दादा दबंग नेता वगैरे काही नाही,” एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी ‘शरद पवारांचा’ मेगा प्लॅन, ‘या’ नेत्यांकडे दिल्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या
हेही वाचा…“अजित दादा आता हिंदू सकल मोर्चात पण दिसतील”, भाजप आमदाराचा बडा दावा
हेही वाचा…“हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत,” रोहित पवारांनी दिला कडक इशारा