रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या जनसंवाद सभांची सुरूवात रायगड जिल्ह्यातून केली. रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या तब्बल पाच सभा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे आता आपला मोर्चा रत्नागिरी जिल्ह्यात वळवला आहे. या सभांमधून उद्धव ठाकरे भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका करतांना दिसत आहे. यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यातून सुरूवात केली आहे. त्यावर मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. उद्धव ठाकरेंच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, परंतु औरंग्याबद्दलचंही प्रेम दिसून येतं. असं म्हणत भाजपचं सुरूवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुघडे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं ? असा खोचक सवाल देखील भाजपने ठाकरेंना केला.
हेही वाचा..“तर पेट्रोलच्या टाकीवर पाण्याची टाकी लिहून ते आगीवर ओतायला लावतील”,अजित पवार गटाने आव्हाडांना डिवचलं
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टिका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली आहे ते पाहा. सच्चा शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडलीय. आता तुमच्याकडे पाव सेनाही उरलेली नाही. असा टोलाही भाजपने ठाकरेंना लगावला. कोकणासाठी उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं हे कोकणातली जनता जाणतेच. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ कोकण वाचवण्यासाठी नाणार-बारसू बद्दल घेतलेली भूमिका, आणि कोकणाला भरभरून उद्धव ठाकरेंनी भरभरून मदत दिलीय. त्यामुळेच कोकणवासीयांच्या उद्धव ठाकरे कायम पाठिशी उभे राहिले. पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ना मदत केली ना तिथे फिरकले. मात्र इतर राज्यातल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तिथल्या चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला धावले. असा पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात आला.
हेही वाचा….“गुन्हेगारांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे का ?” विरोधकांचा राज्य सरकारला सवाल
दरम्यान, कोकणी बांधव सगळं पाहतो आणि लक्षात ठेवतो. कोकण दौऱ्यावर उद्धवसाहेबांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि तुमचा पराभव तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे. त्यानेच घाबरून सोशल मिडिया ट्रोल अकाऊंटप्रमाणे तुमच्याकडून गरळ ओकणं सुरु आहे. आणि एक… राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे! देशासाठी लढणाऱ्या साऱ्यांना सोबत घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे! आणि ते प्रबोधनकारांपासून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलं आणि तोच वारसा उद्धवसाहेब पुढे चालवत आहेत! त्यामुळे आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या आणि समाजात तेढ निर्माण करणं सोडून काहीतरी भलं काम करा. तरीही जनता तुम्हाला माफ करणार नाहीच! असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.
कोकणासाठी उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं हे कोकणातली जनता जाणतेच,
मग ते निसर्ग चक्रीवादळ असो की तौक्ते चक्रीवादळ असो! कोकण वाचवण्यासाठी नाणार-बारसू बद्दल घेतलेली भूमिका असो, की कोकणाला भरभरून केलेली मदत असो! उद्धवसाहेब सातत्याने कोकणात येत राहिले,… https://t.co/JaVjqNfdao— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा.“त्यामुळे गणपत गायकवाड अन् महेश गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये गेले”, अन्….
हेही वाचा…ठरलं तर, तोफ धडाडणार..! वळसे पाटलांच्या होमपिचवर शरद पवारांची सभा, कोल्हेंना मिळणार मोठी ताकद
हेही वाचा…“जरांगे पाटलांसह ओबीसी समाजीची मोठी दिशाभूल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद ?”
हेही वाचा..तर सुनील तटकरेंचा रायगड लोकसभा मतदारसंघात गेम होणार ? ठाकरेंच्या सभांमुळे तटकरेंना फुटला घाम
हेही वाचा…“तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यासाठी बारणेंनी पहिला कामाचा अहवाल द्यावा”, मावळात लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत मोठी धुसफूस