मुंबई : बंडखोर आमदारांच्या कुटुंबियाची सुरक्षितता राज्य सरकारकडून काढून घेण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. असंही ते म्हणाले.
भास्करराव जाधव शिवसेनेच्या विरोधात बंड करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले..;
एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावले आहेत. राज्यातील कोणत्याही आमदारचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केेले जाणारे आरोप पुर्णपणे चुकीचे व दिशाभुल करणारे आहेत. असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहेत.
“अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, मी याआधीच म्हटलं होतं”; चंद्रकांत पाटील
दोन ते तीन दिवस झाले असून देखील बंडखोर आमदारांचं बंड काही थांबता थांबेना झालं आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहारांत शिवसेना आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफो़ड आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आज पुण्यात बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन
कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गद्दार असंही लिहण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं सांगितलं. पुण्यात तसेच इतर शहरात देखील बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली होती. त्यांचा सयंम आता सुटला असून शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
Read also:
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- गायब सचिन जोशी कोण, त्यांचा बंडांशी काय संबंध? व्हायरल झालेल्या फोटोमुळे खळबळ
- “बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा
- बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
- “कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप