छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथे एमाआयएमने आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलचं ढळवून निघालं आहे. यातच आता मुख्यमंत्री आणि इम्तियाज जलील आमनेसामने आले आहेत.
हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय वातावरण निवळावं यासाठी काही उद्योजक पुढे आले आहेत. त्यांनी यांसदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. तर नामांतराच्या विरोधात उद्योजकांनी आपला स्टॅंड घ्यावा. असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
आम्ही लोकशाहीच्या आधारावर आंदोलन करू नये का? जे मोठ मोठे लोक आहेत. त्यांना बोलण्याची हिमंत होत नाही. त्यांनी अगोदर स्टॅंड घ्यायला हवी. आपल्या शहराला एक उद्योगनगरीचा इतिहास आहे. जेव्हा आपण बाहेर जातो, तेव्हा आपण औरंगाबादची ओळख सांगतो. त्यामुळे त्यांचा काही तरी स्टॅंड असायला हवा ना..त्यांनी एकतर सरकारच्या बाजूने नाही तर सरकारच्या विरोधात स्टॅंड घ्यायला हवा. असंही इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
Read also
- हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार
- हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल
- हेही वाचा..“सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था, लगेच प्रत्येय आला” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
- हेही वाचा…साहेबांवरचं प्रेम..! मुश्रीफांवर ईडीची धाड, कार्यकर्त्यानी डोकं आपटून घेतलं
- हेही वाचा…“नो पेन्शन नो वोट’ चा भाजपला धसका, जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक