नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे. यातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु या मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आले नाही. त्यामुळे यामागचं खरं कारण का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे आर्थर रोड जेलमध्ये जाणार,” भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. शिवसेनेतून बाहेर पडताना अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी शिंदे गटाच्या आमदारांनी केल्या होत्या. त्यामुळे अजित पवारांना अर्थखाते देऊ नये असा शिंदे गटाचा आग्रह आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्याबरोबर आलेले छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांना महत्वाची खाती मिळावीत यासाठी अजित पवारांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या सर्व चढाओढीच्या राजकारणात मंत्र्यांचे खातेवाट रखडलेले आहे.
हेही वाचा…भाजपच्या २ मंत्र्यांना डच्चू, अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार ?
दरम्यान, तसेच खातेवाटप झाले नसल्याने राष्ट्रवादीचे ९ मंत्री मंत्रिमंडळ बैठकीचा अपवाद वगळला तर मंत्रालयाकडेही फिरकलेले नाहीत. या मंत्र्यांना दालनाचे वाटपही करण्यात आलेले नाही. त्यामुळे मंत्रालयात येऊन बसायचे कुठे ? हा प्रश्न नवनियुक्त मंत्र्यांसमोर आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आरोप केलेत, चौकशी करा, अन् शिक्षा द्या,” शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
हेही वाचा…“वय ८२ झालं हे खरं आहे, पण गडी काय आहे तु पाहिलाय कुठे? “, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा
हेही वाचा…“येवल्यात मी तुमची माफी मागण्यासाठी आलोय, पण पुन्हा ती चुक करणार नाही,” शरद पवारांचा भुजबळांवर अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“लढाई तुम्ही सुरू केली आहे, त्याचा अंत आम्ही करणार”, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना आव्हान
हेही वाचा…“एकीकडे बाप म्हणायचं, दुसरीकडे घात करायचं”, येवल्यात आव्हाड भुजबळांवर बरसले