नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. येत्या १७ जुलै पासून पावसाळी अधिवेशन सुरू हो त आहे. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता महाराष्ट्राला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. असंही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…““हवं तर राजकारण सोडून देतो, पण तुम्ही राष्ट्रवादीत परत या,” आव्हाडांची अजित पवारांना भावनिक साद”
एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी देखील भाजपसोबत गेल्याने या दोन्ही पक्षाला केंद्रात सामाहून घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एक एक मंत्रिपद देण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात पाच केंद्रीय मंत्रिपद असून आता महाराष्ट्राच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपद आहेत. या चार मंत्र्यापैकी दोन मंत्रीपद गमवावी लागणार आहेत.
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोयता कुऱ्हाडीने खून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ
अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या गटाला एक एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. परंतु भाजपच्या दोन मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आले आहे. अनेक दिवसापासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे आता भाजपच्या कोणत्या मंत्र्यांना हटवून शिंदे-पवार गटाला मंत्रिपद देण्यात येणार. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद, तरीही..,” शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांवर जोरदार टिका
हेही वाचा…“न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद दिलं, अडचणीच्या काळात मदत केली, वाईट वाटतं.? शरद पवारांनी असं उत्तर दिलं की..
हेही वाचा…“अजित पवारांमुळे आमचा त्रिशुळ तयार झाला, आता विनाश अटळ,” फडणवीसांचा विरोधकांना इशारा
हेही वाचा…अजित पवारांकडून मोदींचं कौतुक, शिंदे-फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर