मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, अशा बातम्या मागील काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत खर्गे यांच्या नावावर चर्चा झाल्याचं समजत आहे. खर्गे यांचा नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केल्यानंतर याला अनेकांनी पाठिंबा दिला. तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं भाष्य केलंय.
हेही वाचा…वंचित आघाडीसोबत आली तर जागा किती मिळणार? अशोक चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
१९९७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळी देखील असं म्हटलं जात होतं की, विरोधकांचं नेतृत्व कोण करणार हे ठरलं नाही. पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नाही तर निवडणुकीचे निकाल विरोधात लागतील. परंतु तसं झालं नाही. जनतेला बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात. जनता सत्ताबदलाच्या मन: स्थितीत असतील तर काहीही होऊ शकतं. अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा…अयोध्येचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही, पण राज ठाकरेंना मिळालं, भाजपने सेट केला मोठा प्लॅन
मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवडीवर नितीश कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत. मी जरा देखी नाराज नाही. मी बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की ज्याला पंतप्रधान व्हायचं असेल त्याने व्हावं. माझीही इच्छा नव्हती. बैठकीत मी तेच सांगितलं आहे. मी कधीच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केलेलं नाही. अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…सदावर्तेंच्या अस्तित्वाला मोठा धक्का, एसटी बॅंकेत महाभूकंप, १२ संचालकांचा तडकाफडकी राजीनामा
हेही वाचा…“राम मंदिर आस्थेचा विषय,या आस्थेला राजकीय वळण देऊ नका”, ठाकरे गटाची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा…आताच दोन यात्रा झाल्या, त्यातच आता संमेलन, खर्च कसा झेपणार? काॅंग्रेस नेत्यांचे वरिष्ठांकडे गाऱ्हाणे
हेही वाचा..“पक्षांने आदेश दिला तर उद्या निवडणुक लढायला तयार”, रविंद्र धंगेकरांचं लोकसभा निवडणुकीबाबत सुचक विधान
हेही वाचा..बाळा भेगडेंचा वाढदिवस अन् बारणेंचं टेन्शन वाढवणार ; मावळात महायुतीच्याच नेत्यांमध्ये चढाओढ