मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फडतुस म्हणून उल्लेख केला. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. त्यानंतर सत्ता गेल्याने सगळेच वैफल्यग्रस्त झाले आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपुर्ण प्रकरणावर दिली आहे.
हेही वाचा…सभा ठाण्यात, अंधारेंनी धूर काढला पुण्यात ! भाजप नेत्याचा डान्सबारमधला विषय चव्हाट्यावर
ठाण्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याने उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीदपद मिळाले म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. आता मंत्रिमंडळ विस्तारात गुंडमंत्री असे पद निर्माण करून त्या मंत्र्याला गुंड पोसण्याचे काम द्यावे. अशी जहरी टिका उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा…“भाजपचा मस्तवाल बावनकुळेंनी लक्षात ठेवावं, ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचाय”
उद्धव ठाकरे यांच्या टिकेला एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना फडतूस संबोधण्यात आलं. फडणवीसांनी खुप संयम बाळगला. ते उद्धट किंवा उद्ध्वस्त ठाकरे म्हणाले नाही. ही संस्कृती आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ सुरू आहे. हा खेळ लोक ओळखतात. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असून ती त्यांना बिलकूल मिळणार नाही. आम्हालाही तिखट बोलता येते. परंतु आम्ही मर्यादा पाळून आहोत. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
Read also
हेही वाचा…“डोक्यात खोक्याचा विचार असल्याने त्यांची तशी मानसिकता झालीय”, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका
हेही वाचा…“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं
हेही वाचा…भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या
हेही वाचा…“सततचा पाऊस ही राज्य सरकारकडून आता नैसर्गित आपत्ती घोषित”, राज्य सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…“माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, सामने आओ..! तुम्हे तुम्हारा नाम भूला देंगे” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं ओपन चॅलेंज