मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत आता नैसर्गित आपत्ती घोषित करून शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”
जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीही शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दरानेमदत देण्याचा निर्णय तसेच ‘अतिवृष्टी’ या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील 24 तासामध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम, त्यासोबतच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात आलेला अतिरिक्त निकष नुकसानीकरिता लागू राहणार आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी देखील निकष लागू राहणार आहेत.
हेही वाचा…“नौंटकी करणाऱ्यांसोबत आम्ही युती करणार नाही,” राजू शेट्टींनी नेमकं कुणाला सुनावलं
अकृषि विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोगाची वेतनसंरचना लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तर या पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे ५ कोटी ९० लाख दहा हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
Read also
हेही वाचा…“माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, सामने आओ..! तुम्हे तुम्हारा नाम भूला देंगे” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं ओपन चॅलेंज
हेही वाचा…सभा ठाण्यात, अंधारेंनी धूर काढला पुण्यात ! भाजप नेत्याचा डान्सबारमधला विषय चव्हाट्यावर
हेही वाचा…“भाजपचा मस्तवाल बावनकुळेंनी लक्षात ठेवावं, ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचाय”
हेही वाचा…“ते मला फडतूस, लाचार टरबूज्या, छोटा भीम …”, राष्ट्रवादीची फडणवीसांवर जहरी टिका
हेही वाचा…“सामना वर्तमान पत्र लवकरच बंद होणार”? केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा