मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषेद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टिका केली. तसेच त्यांनी सामना वर्तमान पत्रावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता त्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर..”, सुषमा अंधारे फडणवीसांवर काय बोलून गेली ?
मी एक वृत्तपत्र घेतला. त्याच नाव सामना असून त्याला मी वृत्तपत्र म्हणणार नाही. पत्रकारांनी आजचा सामना वाचावा. त्यात जनतेच्या महाराष्ट्राच्या, देशाच्या हितांच काय आहे हे सांगावं. तसेच सर्वसामान्य जनतेला ही भाषा आवडेल आणि रूचेल अशी भाषा आहे का हे पाहावं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं वृत्तपत्र राज्यात चालू राहावं, याचा विचार करून यासंबंधी योग्य कारवाई करावी. अशी मागणी नारायण राणे यांनी केली.
हेही वाचा…“तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय,” संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा
सुशांत सिंग राजपूत का मारले ? दिशा सालीयन ला का मारले ? असा सवाल करीत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करतांना पुन्हा सुशांत राजपुत सिंगचा विषय काढला. तसेच तुझी पंतप्रधान बद्दल बोलण्याची लायकी आहे का? बाळासाहेबांचे नाव आणि पवार साहेबांच्या मेहेरबानी मुळे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या तोंडी असलेली भाषा शोभत नाही..ते मुख्यमंत्री असताना राज्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती होती? असा सवालही त्यांनी केला.
Read also
हेही वाचा…“सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”
हेही वाचा…“नौंटकी करणाऱ्यांसोबत आम्ही युती करणार नाही,” राजू शेट्टींनी नेमकं कुणाला सुनावलं
हेही वाचा…‘स्वरदा बापट’ की ‘ मुरलीधर मोहोळ’, पुणे लोकसभेला ‘कुणाला’ उमेदवारी ?
हेही वाचा…या दशकातला सगळ्यात मोठा विनोद, ‘घराबाहेर पडू देणार नाही’, सुषमा अंधारेंनी बावनकुळेंची सगळीच काढली
हेही वाचा…“30 लाख दे, नाहीतर गोळ्या घालून ठार करू,” काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी