मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा यशवंतराव चव्हाण सेंटरवर महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महिला मेळाव्यातून शरद पवार गटातील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अलिकडेच नाशिक येथील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवाराने टिप्पणी केलीय.
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,..
सरकार खासगी कंपन्यांना जिल्हा परिषद शाळा चालवायला देणार आहेत. सीएसआर फंडातून या शाळा चालवण्यास परवानगी देणार आहेत. यातून विकास करावा. ज्या कंपनीने शाळा दत्तक घेतली, त्या शाळेला कोणतंही नाव घेण्याचा नाव देण्याचा अधिकार आहे. शाळेच्या कारभारात दखल देण्याचा, शाळेची संपत्ती खासगी कार्यक्रमासाठी देण्याचा अधिकार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एका मद्य बनवणाऱ्या कंपनीने एक शाळा दत्तक घेतली. तेथे त्यांनी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला. अशी टिका शरद पवारांनी केलीय.
हेही वाचा…पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांनी दिला राजीनामा ? नेमकं काय घडलं?
दरम्यान, शरद पवारांनी महिला मेळाव्यातून सरकारला महिला सुरक्षावरूनही प्रश्न केलाय. १ जाने २०२३ ते ३१ ते २०२३ किती तरूणी, महिला, मुली बेपत्ता झाल्या? सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आलं आहे. १९ हजार ५५४ फक्त ५ महिन्यात बेपत्ता झाल्या. एवढ्या महिला बेपत्ता होत असतील तर गप्प बसायचं का ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…ललित पाटीलसाठी रूग्णालयात महिला कोण पाठवायचा ? धंगेकरांनी आणखी एक बॉ’म्ब टाकला
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?
हेही वाचा…नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, शिंदे गटाला मोठा धक्का बसणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार