मुंबई : निवडणुक आयोगाने काल शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता ठाकरे गटाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावरून निवडणुक आयोगाने तात्पुरता दिलेलं मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त पुण्यातील पोटनिवडणुकांपुरतंच वापरता येणार असल्याचं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे याविरोधात पुन्हा एकदा ठाकरे गट निवडणुक आयोगाकडे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“शिवसेना अन् धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
मी आणीबाणीबद्दल एकलं आहे. मी त्यावेळेस खुप लहान होते. त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा,कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचच नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणुक आयोग हे पारदर्शक आहे. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणुक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय असे वाटत आहे. शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..‘“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तारधिकारी उद्धव असतील, हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे बाहेर पडले आणि स्वत:चा पक्ष काढला. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणुक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला. असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Read also
- हेही वाचा..“धनुष्यबाण गेल्यानंतर आता ‘मशाल’ही ठाकरेंकडून जाणार” निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्का
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंनंतर आता अजित पवारांचा नंबर”, भाजप नेत्यांचं सुचक विधान
- हेही वाचा…“शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,” उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
- हेही वाचा..““विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठाम”, रविंद्र चव्हाण यांनी घेतली मनसेच्या नेत्यांची भेट
- हेही वाचा..‘शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच, राजकीय गणितं बदलली, 2024 ला शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी?