नागपूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आज हिवाळी अधिवेशनच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी विरोधकांनी पायऱ्यांवर कांद्यांच्या माळा हातात घेऊन महाविकास आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या विरोधात टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंच्याच २२ आमदारांच्या सह्या, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
केंद्रातील भाजप सरकार कसे शेतकरी विरोधी आहेत. याची तीन ज्वलंत उदाहरणे अंबादास दानवे यांनी दिली आहेत. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला चांगला भाव मिळत असताना परदेशातून कापूस आणण्याची परवानगी दिली. परिणामी भाव पडले आणि शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे अधिकचे पडण्याची शक्यता संपली आहे. कांदा उत्पादक शेतकरी गारपीट आणि बेमोसमी पावसाने त्रस्त असताना परिस्थितीतून सावरण्याची संधी सरकारने हिरावून घेतली ती कांद्यावर निर्यातबंदी लागू करून केली असल्याचे दानवेंनी म्हटलंय.
हेही वाचा…शिंदे सरकारचा अनगोंदी कारभार, देशाचा तिरंगा कार्यक्रमात लावला उलटा ; विरोधकांची सडकून टिका
दरम्यान, राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा असलेल्या साखर कारखान्यांवर उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली. महाराष्ट्र इथेनॉल निर्मितीत अग्रेसर आल्याने याचा सर्वाधिक तोटा आपल्यालाच होणार आहे. कारखाना आजारी झाले तर याचा थेट परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांवर होणार आहे. एकीकडे शेतकरी पायावर उभे राहत असताना त्यांना रोखायचे आणि जुजबी रकमा ‘इव्हेंट’ करून त्यांच्या खात्यावर टाकायच्या, हेच आहे यांचे शेतकाऱ्यांसाठीचे धोरण. असंही दानवेंनी म्हटलंय.
केंद्रातील भाजप सरकार कसे शेतकरी विरोधी आहे याची तीन ज्वलंत उदाहरणे..
१. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला चांगला भाव मिळत असताना परदेशातून कापूस आणण्याची परवानगी दिली. परिणामी भाव पडले आणि शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे अधिकचे पडण्याची शक्यता संपली.
२. कांदा उत्पादक शेतकरी…
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन
हेही वाचा…अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
हेही वाचा…“तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं”; भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा डिवचलं