मुंबई : काॅंग्रेस पक्षाची भूमिका मांडतोय, काॅंग्रेस पक्षाची भूमिका म्हणजे जनतेची भूमिका आहे. जनतेचे प्रश्न घेणे, त्यांना न्याय मिळवून देणं हे काॅंग्रेसचं ध्येयधोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधीकडे माझी तक्रार मांडली आहे. त्याचा मला आनंदच आहे. तक्रारीचं निराकारण करायचं असेल, तर त्यातून निश्चितच एक चांगला मार्ग निघेल, असं वक्तव्य काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला
मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच सांगितलं की, राज्य़ चालवायचं असेल तर पैशाची गरज लागते. लाखो जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडे आहेत. देशाच्या तिजोरीमध्ये सर्वोत जास्त पैसा हा महाराष्ट्रातून जातो. त्यामुळे याच महाराष्ट्राला केंद्रातील भाजपचं सरकार आर्थिक अडचणीत आणत असेल तर यावर चिंतन कऱण्याची गरज आहे. असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
“आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नाना पटोले यांनी अलिकडेच महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून टिकास्त्र सोडलं होतं. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेने अनुक्रमे पुणे आणि मुंबईत आपल्या सोयीनुसार प्रभागरचना करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच मुंबई महापालिकेत काॅंग्रेस ही विरोधात उभी आहे. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वंतत्र्यपणे निवडणुका लढविणार असल्याचं काॅंग्रेस नेते भाई जगताप यांनी काल केलं होतं.
राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
दरम्यान, महाविकास आघाडीत सध्या काॅंग्रेसची धुसफुस वाढली आहे. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेस आघाडीसोबत लढण्याची शक्यता आत कुठे तरी कमी होत चालली आहे. कारण काॅंग्रेसचे नेत सध्या ज्या पद्धतीचे वक्तव्य करीत आहे. त्यावरून तरी असं वाटतं की काॅंग्रेस स्वंतत्र्यपणे निवडणुका लढण्याची शक्यता आहे.
Read also:
- आता वेळ आली की, पुढील 25 वर्ष..; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना सुचना
- “तूर्तास अयोध्याचा भोंगा स्थगित करून नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू”
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान