पुणे : मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं, मी पक्षाबरोबर गेली 18 वर्ष अढळच राहिलो. गरज नसताना चुकीच्या माणसाच्या रिपोर्टिंगनंतर माझी त्यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्याचं सांगत शिवाजी राव आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्या टिकेला तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरेंचा तो घाव वर्मी लागला. असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लावला.
“शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल
शिरूर मतदारसंघातील काही लोकं ढळली पण खरी अढळ लोकं माझ्यासोबत कायम आहेत. नाव एक आणि करायचं दुसरंच, असा हा प्रकार झाला. शिरूर मतदारसंघात शिवसेनी किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावाला बट्टा लागणे हा शिवसेनेचा अपमान आहे. त्यामुळे यापुढे शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये, असं म्हणत ठाकरेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांबाबत शिवसैनिकांना सांगितले.
“मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? हे मला माहितीय”; उदय सामंत
मी पक्षाशी गद्दारी केली नाही, शिवसेनेने माझ्याशी गद्दारी केली नाही, मला गद्दार म्हणायचा कुणाचाही संबंध नाही. काहीही कारण नसताना पक्षाने माझी हकालपट्टी केली. त्यानंतर दोन तासांनी मला फोन करून सांगतात मी चुकलो, माफ करा, शिरूरमध्ये आपल्याला पुन्हा कामाला लागायचंय. असा निरोप त्यांनी मला धाडला. झालं गेलं विसरून आम्ही पुन्हा कामाला लागलो. पण त्यांना रिपोर्टंगि करणारे लोक चुकीचे आहेत. त्यामुळेच पक्षाचं नुकसान झालंय . माझी हकालपट्टी झाल्याने माझे कार्यकर्ते-पदाधिकारी आणि मी स्वत: मी दुखावलो गेलो तसेच हिंदुत्वापासून दुर गेलेल्या उद्धव ठाकरेंपासून आपण फारकत घ्यावी, असा निर्णय झाला अन् मी त्यांना रामराम ठोकला. असंही आढळरावांनी स्पष्ट केलं.
“अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं
दरम्यान, पक्षासोबत गेली 18 वर्ष अढळच राहिलो, अनेक संकट आली, अनेक वादळं आली, खुप संघर्ष करावा लागला. परंतु त्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो. गेली 18 वर्ष उद्धवजींना साथ दिली. पण 18 वर्षाच्या निष्ठेचं फळ म्हणून कुणाचं तरी ऐकून, कुणाच्या तरी कानी लागून उद्धवजींनी माझी हकालपट्टी केली. हा प्रकार मला आवडला नाही, महाराष्ट्रालाही हा सगळा प्रकार आवडला नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर..;” राऊतांचा गंभीर आरोप
- “ऐन सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली”; सुप्रिया सुळे
- “बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका”; चंद्रकांत खैरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “शरद पवारांचं नाव अन् काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल?”
- “शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा