मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून शरद पवार यांच्या राजीनाम्याचीच चर्चा सुरू आहे. यातच आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली असून या बैठकीत दोन प्रस्ताव मांडण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे सुपुर्द केले असून शरद पवार यांनी यासाठी वेळ मागितला आहे.
हेही वाचा…“मी पुन्हा येईन, तो कसा येतो, ते तुम्हाला….”, तापलेल्या राजकारणात फडणवीसांचं सुचक विधान
मंगळवारी झालेल्या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर देश तसेच राज्यपातळीवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. अशी मागणी जोर धरू लागली. यातच आजच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने नामंजूर करत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”
मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीतील प्रस्ताव घेऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपला प्रस्ताव शरद पवारांकडे देण्यात आला. यावेळी या प्रस्तावावर मला विचार करण्यासाठी अजून वेळ देण्यात यावा. असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
हेही वाचा…“समितीने राजीनामा फेटाळ्यानंतर फटाके, मिठाई वाटत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष”, शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष ?
हेही वाचा…“राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही”, राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने राजकारणात काहुल माजलं
हेही वाचा…Breaking: शरद पवारांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस समितीचा महत्त्वाचा निर्णय! कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न