मुंबई : आज महाविकास आघाडीने हल्लाबोल मोर्चाची हाक पुकारली आहे. यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी पोहचले असून तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी होतांना दिसत आहेत. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एक नव्हे तर चार ते पाच नेत्यांनी असे अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एकांनी चुक केली तर आपण ती मान्य करू, परंतु एक चुक करतो अन् दुसरा लगेचच ती चुक पुन्हा करतो, त्यामुळे हे सर्व ठरवून केलं जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केला आहे.
राज्यपालांनी आपल्या वक्तव्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केलीय. परंतु भारतात कुणीही महापुरूषांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं हे चुकीचेच आहे. त्यामुळे आपण त्याचं खंडण केलं पाहिजे. नाहीतर कुणीही येईल अन् टोपली मारून जाईल, हे नही चलेगा. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय.
“वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”
लोकं भीक केव्हा मागतात. जेव्हा त्याला अत्यंत गरज असते, आणि त्याचीही चेष्टा करणं हेही चुकीचे आहे. म्हणजे लोकं भीक मागतात म्हणून त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं, हेही वाईट आहे आणि कर्मवीर, आंबेडकर यांच्याबद्दल बोलणं हे तर लाजीरवाणं आहे. परंतु हे असं म्हणणे यावरून तुमची वैचारीक बैठक काय आहे. हे यातून कळतं. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “शिंदे सरकारचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली चिरडलंय, त्यांनी आमच्या मोर्चात सामील व्हावं”; संजय राऊत
- “महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी…!” म्हणाले, कृपया वस्तुस्थिती…;
- राजकारण तापणार…! भाजपचं माफी मांगो आंदोलन तर आघाडीचा हल्लाबोल
- “गुजरात जिंकल्याने भाजपचा हेतू साध्य, आता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला द्या”
- हल्लाबोल…! महामोर्चाची जोरदार तयारी, टी-शर्ट, बॅनर, अन् आज धमाकेदार टिजर रिलीज