मुंबई : महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरले असतील तर त्यांनी देखील या मोर्चात सामील व्हा. असं आवाहन करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महामार्चा सुरू होण्याच्या अगोदर विरोधकांवर निशाणा साधला आहे. परंतु त्यांचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दडपलं गेलं आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रातल्या लढ्यातले मोर्चा पाहिलेले आहेत. त्या पीढीला देखील या मोर्चावरून तेव्हाचे मोर्चांची आठवण येईल, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
संयुक्त लढ्यातील मोर्चे हे प्रेमाने भारवलेले आहेत, आणि आत्ताचेही मोर्चे तसेच आहेत. तसेच त्यांनी ठाणे बंद, आणि त्यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनावरून देखील कडाडून टिका केली आहे. त्यांच्या डोक्यात गांढूळांचा मेंदू असून तो नेहमी वळवळतोय. तुम्ही सरकार आहात. विचारांचा लढा विचाराने करा. ठाणे बंद का ठेवताहेत. कुठला तरी वारकऱ्यांचा गट पकडायचा आणि आमच्या विरोधात सोडून द्यायचं. हे किती काळ चालणार असंही म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदेंना सुनावलं.
“वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”
सत्तेवर असल्याचं भान ठेऊन प्रगल्बता दाखवा. हे राज्य फार महत्वाचं असून खुप मोठं आहे. महापुरूषांचा अपमानाबाबत महाराष्ट्र बंद करायला पाहिजे होता. परंतु त्यांनी तसं केलं नसून फक्त ठाणे बंद केलं आहे. तसेचं त्यांची ताकद फक्त तेवढीच आहे. तसेच ते बंद करून आमच्या मोर्चात सामील व्हा. असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
“मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान, महापुरूषांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडी तर्फे मुंबईत महामोर्चाची हाक देण्यात आली आहे. त्यावरून या मोर्चाची सुरूवात झाली असून या मोर्चात आघाडीतील तीन्ही पक्ष सहभागी झाले आहेत.
Read also
- “महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी…!” म्हणाले, कृपया वस्तुस्थिती…;
- राजकारण तापणार…! भाजपचं माफी मांगो आंदोलन तर आघाडीचा हल्लाबोल
- “गुजरात जिंकल्याने भाजपचा हेतू साध्य, आता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला द्या”
- हल्लाबोल…! महामोर्चाची जोरदार तयारी, टी-शर्ट, बॅनर, अन् आज धमाकेदार टिजर रिलीज
- “मनुस्मृति जागी झाली अन् हे पुन्हा एकदा पिसाळले”; अंधारेंच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात