मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडील वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. आज आणि उद्या दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू राहणार असून लवकरच अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर…” भुषण देसाईंच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरेंची खोचक टिका
राज्यपाल फक्त त्यांच्याकडे आलेल्या माहिती किंवा पुराव्यांवरच निर्णय घेऊ शकतात. ते निवडणुक आयोगाप्रमाणे यामध्ये चौकशीचे आदेश देऊ शकत नाहीत. जर बहुसंख्या आमदारांनी पाठिंबा काढला असेल, तर राज्यपालांसमोर पुराव्यांसह आधारीत निर्णय घेण्याशिवाय अजून कोणता मार्ग राहतो.? असाही सवाल उपस्थित केला गेला. तर उद्धव ठाकरे यांना माहिती होतं की त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव घेण्याच्या दिलेल्या अंतरिम आदेशानंतर १० मिनिटांत त्यांनी राजीनामा दिला.
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आंतरराष्ट्रीय नजर, केनियाच्या सरन्यायाधीश कोर्टात हजर
त्याचबरोबर ३४ आमदारांनी शिंदेंना विधीमंडळ गटनेते पदी नियुक्त केलं. भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून निवड केली. याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली होती. राज्यपालांनीही त्याचा स्वीकार केला. याबाबत उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार सचिवांना ईमेलवर माहिती देण्यात आली होती. बहुमतांचं तत्व हे सर्वात महत्त्वाचं असतं. अपात्रतेच्या मुद्यापेक्षाही ते महत्त्वाचं असतं. यासंदर्भात अनेक निकाल आहेत न्यायालयाचे. त्यामुळेच राज्यपाल असं सरकार स्थापन करतात, ज्यांचं नेतृत्व बहुमताचा विश्वास असणारी व्यक्ती करत असते.
हेही वाचा…“गोखले यांना अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली” राऊतांचा सोमय्या,फडणवीसांवर निशाणा
दरम्यान, सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपला असून आता तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू होईल. ११ ते १२ वाजेच्या दरम्यान तुषार मेहता बाजू मांडणार असून त्यानंतर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी रिजॉंईंडर सादर करतील.
Read also
- हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
- हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली
- हेही वाचा…शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक भाजपच्या गळ्याला, फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश
- हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला
- हेही वाचा..एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादात विसंगती, कोर्टाने वकिलांना सुनावलं