मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये गुरूवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जवळपास दीड तास बैठक झाली. यामध्ये खातेवाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खातेवाटपात शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पद तर एकनाथ शिंदेंना ‘अर्थमंत्री’ पद देऊन तिढा सोडवा”
शिवसेनेकडील कृषी खाते तसेच भाजपकडील ग्रामविकास खाते पवार गटाकडे जाणार असल्याचे समजत आहे. याशिवाय पवार गटाला अर्थ व नियोजन खाते व अन्यही एक महत्वाचे खाते मिळणार असल्याची शक्यता आहे. तर ठाण्यातील निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली.
हेही वाचा…आदिती तटकरेंवर शिंदे गटाची टिका, दोन्ही वादात आता मनसेची उडी, म्हणाले, “अशा नेत्यांकडून…”
यातच आता अजित पवार यांना अर्थ, छगन भुजबळांना कृषी, सहकार खातं दिलीप वळसे पाटीलांना, परिवहन विभाग धर्मराव अत्राम यांना तर सामाजिक न्याय धनंजय मुंडेंना अन्न नागरी पुरवठा ,अनिल भाईदास पाटील, महिला बाल कल्याण अदिती तटकरे, क्रीडा – संजय बनसोडे, अल्पसंख्यांक हसन मुश्रीफ यांना देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आपण मेहबुबा मुक्तिसोबत गेलो पण, जेव्हा वेळ आली…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“जिथं जिथं अन्याय होईल, तिथे एकनाथ शिंदे जन्म घेईन, अजित पवार… “, फडणवीसांचं मित्र पक्षांबाबत सुचक वक्तव्य
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, सगळा किस्सा सांगितला
हेही वाचा…“विधानसभेत २०० तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकणार “
हेही वाचा…महायुतीत आता तिन्ही पक्षाची समन्वय समिती, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का ?