मुंबई : एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे छोटे नेते नसून बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी विचार करून भाजपसोबत आले आहेत. तसेच ज्या ज्याठिकाणी अन्याय होईल. त्याठिकाणी एकनाथ शिंदे जन्माला येईल. शिवसेनेसोबत आमची भावनिक मैत्री असून अजित पवार यांच्यासोबत राजकीय मैत्री केली आहे. त्यांची ही राजकीय मैत्री येत्या १० दिवसात भावनिक होईल. तसेच पुढच्या निवडणुकीत त्यांना सोबत घेऊन आपण विजयी होऊ. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आज भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…“मला तडजोड करावी लागली तर…,” सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं विधान
देशात सध्या सगळे लोक मोदींच्या विरोधात एकत्रित येत आहेत. त्यामुळे आता आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. परंतु काॅंग्रेस आणि एमआयएम सारख्या विचारांच्या पक्षातील नेत्यांना आमचे दरवाजे बंद आहेत. याआधी आम्ही मागे २२ पक्षाचं सरकार चालवून दाखवलं आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा विजयी करून भारताच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचसोबत राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या मित्र पक्षाला सोबत घेऊन निवडणुक लढविणार आहे. असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, अन्..”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीचा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देवेंद्र फडणवीसांनी सुचक विधान केलं. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागापैकी १५२ जागांवर भाजप विजय मिळवणार. परंतु त्याचसोबत मित्रपक्षांच्या इतर जागांसाठी देखील बळ लावू असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, सगळा किस्सा सांगितला
हेही वाचा…“विधानसभेत २०० तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकणार “
हेही वाचा…महायुतीत आता तिन्ही पक्षाची समन्वय समिती, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का ?
हेही वाचा…“अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पद तर एकनाथ शिंदेंना ‘अर्थमंत्री’ पद देऊन तिढा सोडवा”
हेही वाचा…आदिती तटकरेंवर शिंदे गटाची टिका, दोन्ही वादात आता मनसेची उडी, म्हणाले, “अशा नेत्यांकडून…”