मुंबई : पोहरादेवीला जाऊन त्याठिकाणी खोटी शपथ घेत असल्याचं सांगायला उद्धव ठाकरे गेले होते. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली होती. त्यावेळी रात्री एक वाजता उद्धव ठाकरे यांनी फोन करून याविषयी बोलणी केली होती. त्यानंतर अमित शहा यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाली होती. परंतु उद्धव ठाकरेंनीच शब्द फिरवला असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते भिवंडीत भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
हेही वाचा…“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, अन्..”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी
मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत काय बोलायचं, हे मराठीत आणि हिंदीत रश्मी वहिनीसमोरच एकदा ,दोनदा सराव केला होता. त्यानंतरच्या संपुर्ण भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढविल्या जातील असं सांगण्यात आलं. पण यामध्ये एक व्यक्ती आला आणि युती होणार नाही. असं म्हणाला. त्यानंतर आमचा संवाद सपंला. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा…“ज्या नेत्यांनी आपलं वयाइतकं राजकारण केलं…,” सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर साधला निशाणा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा संवाद संपल्यानंतर राष्ट्रवादीची ऑफर आली. त्यानंतर जे काही घडलं ते सर्वांना माहिती आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला. परंतु हे दोन्ही नेत्यांना राजकीय अनुभव मोठा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. असं पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच आमचं सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. परंतु काॅंग्रेस आणि एमआयएम सारख्या विचार असणाऱ्या पक्षांना आमच्यात स्थान नाही. असंही फडणवीसांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“विधानसभेत २०० तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकणार “
हेही वाचा…महायुतीत आता तिन्ही पक्षाची समन्वय समिती, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का ?
हेही वाचा…“अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पद तर एकनाथ शिंदेंना ‘अर्थमंत्री’ पद देऊन तिढा सोडवा”
हेही वाचा…आदिती तटकरेंवर शिंदे गटाची टिका, दोन्ही वादात आता मनसेची उडी, म्हणाले, “अशा नेत्यांकडून…”
हेही वाचा…“मला तडजोड करावी लागली तर…,” सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं विधान