मुंबई : राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यावरून सध्या अनेक गोष्टींची चर्च राजकीय वर्तुळात केली जात आहे. तसेच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थमंत्रीपदावरून रखडला असल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पर्याय सुचवला आहे.
हेही वाचा…प्रामाणिक कार्यकर्त्याला अजितदादांकडून बळ, सुदर्शन जगदाळेंची सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
अर्थ खात्यावरून चाललेल्या राजकीय गोंधळावरून अजित पवार यांना मुख्यमंत्री पद तर एकनाथ शिंदे यांना अर्थमंत्री पद देऊन टाकावं. असा खोचक सल्ला अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच मंत्रीपद गळ्यात पडले या आशेने डोळे लावून बसलेल्यांचे शिवलेले कोट कपाटातच राहतील, अस चित्र सध्या दिसत आहे. असंही दानवे म्हणाले.
हेही वाचा…‘त्या’ आमदारांना वळवण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न, थेट फोन करून संपर्क
दरम्यान, जे सोबत आले आहेत त्यांना शिंदे-फडणवीस सरकार न्याय देऊ शकले नाहीत मग अपक्षाला न्याय देणं तर लांबच आहे. अजित पवार हे भाजपच्या दिल्लीवारीवर आधी टिका करत होते. मात्र आज शालीन नेतृत्व असलेल्या अजित पवार यांनाच दिल्लीच्या दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागतेय, यासारखे दुर्दैव नाही अशी टिका देखील दानवेंनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…आदिती तटकरेंवर शिंदे गटाची टिका, दोन्ही वादात आता मनसेची उडी, म्हणाले, “अशा नेत्यांकडून…”
हेही वाचा…“मला तडजोड करावी लागली तर…,” सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, अन्..”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी
हेही वाचा…“ज्या नेत्यांनी आपलं वयाइतकं राजकारण केलं…,” सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…राजकीय गोंधळात शरद पवार आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का…! पण काॅंग्रेसला मोठा फायदा