मंबई : भाजप महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने एन्ट्री केल्याने राज्य मंत्रिमंडळाचा पेच निर्माण झाला आहे. यातच राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना अजूनही खातेवाटप करण्यात आलेलं नाही. मागील काही दिवसापासून मंत्रिमंडळाचा पेच निर्माण झाला आहे. यासाठी आता महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…राजकीय गोंधळात शरद पवार आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का…! पण काॅंग्रेसला मोठा फायदा
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गटाला अर्थमंत्री पद देण्यात यावं, यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी आता महायुतीतील तिन्ही पक्षातील १२ जणांची समन्वय समिती नेमली असल्याचं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा…प्रामाणिक कार्यकर्त्याला अजितदादांकडून बळ, सुदर्शन जगदाळेंची सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
महायुतीच्या समन्वय समितीत शिंदे गटातील उदय सामंत, शंभुराजे देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड, आशिष शेलार त राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह बारा लोकांची समन्वय समिती स्थापन केली जाणार असून या समितीच्या अंतर्गत सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पद तर एकनाथ शिंदेंना ‘अर्थमंत्री’ पद देऊन तिढा सोडवा”
हेही वाचा…आदिती तटकरेंवर शिंदे गटाची टिका, दोन्ही वादात आता मनसेची उडी, म्हणाले, “अशा नेत्यांकडून…”
हेही वाचा…“मला तडजोड करावी लागली तर…,” सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, अन्..”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी
हेही वाचा…“ज्या नेत्यांनी आपलं वयाइतकं राजकारण केलं…,” सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर साधला निशाणा