मुंबई : पोहरादेवीला जाऊन त्याठिकाणी खोटी शपथ घेत असल्याचं सांगायला उद्धव ठाकरे गेले होते. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली होती. त्यावेळी रात्री एक वाजता उद्धव ठाकरे यांनी फोन करून याविषयी बोलणी केली होती. त्यानंतर अमित शहा यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाली होती. परंतु उद्धव ठाकरेंनीच शब्द फिरवला असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते भिवंडीत भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
हेही वाचा…आदिती तटकरेंवर शिंदे गटाची टिका, दोन्ही वादात आता मनसेची उडी, म्हणाले, “अशा नेत्यांकडून…”
देशात सध्या सगळे लोक मोदींच्या विरोधात एकत्रित येत आहेत. त्यामुळे आता आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. परंतु काॅंग्रेस आणि एमआयएम सारख्या विचारांच्या पक्षातील नेत्यांना आमचे दरवाजे बंद आहेत. याआधी आम्ही मागे २२ पक्षाचं सरकार चालवून दाखवलं आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा विजयी करून भारताच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचसोबत राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या मित्र पक्षाला सोबत घेऊन निवडणुक लढविणार आहे. असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…“मला तडजोड करावी लागली तर…,” सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं विधान
दरम्यान, देशाकरीता मेहबुबा मुक्तिसोबत जावं लागलं. कारण तेव्हा ती आवश्यकता होती. काही लोकांनी टीका केली. पण आवश्यकात संपी तेव्हा लाथ मारून बाहेर काढण्याचं कामपण केलं. कारम काश्मिरमधील कलम ३७० आपल्याला घालवायचं होतं. अंतिम स्वप्न तेच होतं. अजून पाकव्याप्त काश्मिर बाकी आहे ते आपलं अंतिम ध्येय असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“जिथं जिथं अन्याय होईल, तिथे एकनाथ शिंदे जन्म घेईन, अजित पवार… “, फडणवीसांचं मित्र पक्षांबाबत सुचक वक्तव्य
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, सगळा किस्सा सांगितला
हेही वाचा…“विधानसभेत २०० तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकणार “
हेही वाचा…महायुतीत आता तिन्ही पक्षाची समन्वय समिती, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का ?
हेही वाचा…“अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पद तर एकनाथ शिंदेंना ‘अर्थमंत्री’ पद देऊन तिढा सोडवा”