मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. अशी टिका काॅंग्रेसचे विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आमनेसामने, काॅंग्रेसच्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय ?
सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठे मोठे इव्हेंट करून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली पण अद्याप ही मदत मिळालेली नाही.असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘बडा’ नेता बीआरएस पक्षाच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले पण जाचक अटीमुळे ही मतदही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना काय मिळाले तर केवळ पोकळ घोषणा मिळाल्या अशी परिस्थिती आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी मांडली पुढची भूमिका, अमित शहांची भेट घेणार, वातावरण तापणार?
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांचा गेम करण्याचं ठरवलं”, सुषमा अंधारेंचं नवनीत राणांवर सुचक वक्तव्य
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना दिला कानमंत्र, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हेही वाचा…“संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत”, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार