मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे संचालक असलेल्या कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर ईडीने धाड टाकली. ईडीने तब्बल 30 तास चौकशी करून जिल्ह्या बॅंकेंच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यातच त्याच बॅंकेतील एका कर्मचाऱ्याला ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने मोठी खळबळ उडाली. 30 तास चौकशीमुळे हा कर्मचारी तणावात होता अशी माहिती समोर आली आहे.
“…मग त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?” राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर
जिल्हा बॅंकेची चौकशी करण्यासाठी आलेले डॉ. मानेंसह अधिकाऱ्यांचे डोळे सुजले होते. त्यांनी रात्री 30 चौकशी सुरू राहिल्याने अधिकाऱ्यांना झोप नसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. डॉ. ए.बी. मानेसंह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचे डोळे सुजले होते. ब्रिक्स व संताजी घोरपडे सारख कारखाना व जिल्ह्या बॅंकेमध्ये झालेल्या व्यवहार व त्यासंबंधित कागदपत्रांच्या झेराक्स अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
सत्यजीत तांबेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत ;” नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी पुर्ण रात्र खुर्चीवर बसून काढली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता आले होते. रात्र व गुरूवाराचा दिवस ते बॅंकेतच थांबून होते. रात्री जेवण केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी खुर्चीवर बसूनच रात्र जागून काढली. बॅंकेची तरलता ही तपासली मिनी लॉन्ड्रिंगचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना असल्याने त्यासंबंधी ते सर्व मुद्यांच्या मुळापर्यंत पोहोचले होते. असंही सांगण्यात येत आहे.
पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले. ईडीने तब्बल ३० तास ‘ब्रिक्स’ व ‘ संताजी घोरपडे’ साखर कारखान्याशी संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली.
Read also
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- “सुजान शिक्षकांनी भाजपला अक्षर:श लोळविले,” खुनशी राजकारण, जातीयवादी विष म्हणत राष्ट्रवादीने पुन्हा डिवचलं
- पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचं भाष्य..! म्हणाले की, “झालं गेलं गंगेला मिळालं, आता..”
- संजय राऊत अन् नारायण राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- तब्बल 30 तास मतमोजणी, अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विजयी, भाजपचा सुपडा साफ