रायगड : इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर अनेक घरं ढिगाऱ्याखाली गेल्याने अनेक जण जखमी तर पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री दीड ते दोन किलोमीटर पायी चालून घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मृत्यूंच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. यातच आता केंद्र सरकारकडून देखील मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…माळीणची पुन्हा आवृत्ती, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ हजर झालेत. अत्यंत घनदाट झाडीतून अवघड वाटेतून पायी चालत एकनाथ शिंदे पोहचले. त्यानंतर त्यांनी घटनेचा आढावा घेतला आहे. अमित शाह यांच्याकडून इर्शाळवाडीतील घटनेची विचारपूस करण्याकरिता फोन आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. केंद्राकडून आवश्यक असलेली सर्व मदत मिळण्याबाबत त्यांनी आश्वस्त केल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा…“सासू नाही तर दबंग मित्र म्हणून वाट्याला आलाय,” अजित दादांवर शहाजी बापूंचं मोठं विधान
इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर एनडीआरएफची टीम, अग्रीशामक दल, समाजसेवी संघटना आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरू केले आहे. मात्र पावसामुळे या बचावकार्यात अडथळे येत आहे. जवळपास चाळीस कुटूंब हे दरडीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, आदिती तटकरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊतांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढा, कधी देश सोडून..”, भाजपच्या आमदाराची मागणी
हेही वाचा…“इर्शालवाडी दुर्घटनेच्या अजित पवारांना तीव्र दु:ख, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…मोठी बातमी …! संजय राऊतांना मोठा धक्का…! कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांना ईडीकडून अटक
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू
हेही वाचा…इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून गाव ढिगऱ्याखाली.., मंत्रिमंडळातील त्रिमूर्ती लागली कामाला