मुंबई : ठाणे, मुंबई या जिल्ह्यामध्ये आपल्या तसेच मित्रपक्षाचे अनेक जण 2014 च्या निवडणुकीत मोदींच्या ट्रेन मध्ये निघून गेलेत. भाजपाशिवाय या जिल्ह्यात कुणीही निवडून जाऊ शकत नाही. आता अनेक जण यावर दावे सांगायले लागले आहेत. ठाणे, मुंबई, पालघर, असे अनेक जिल्हे भाजपचे होते. ठाणे लोकसभा देखील भाजपचीच आहे. मोदींनी ज्या योजना आणल्या त्या तरी राबवल्या पाहिजे होत्या. असा शाब्दिक टोला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शिंदे गटाला दिला आहे. त्यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंची राज्याबाहेरच पहिल्यांदाच बैठक, केंद्र स्तरावर भाजपसोबत काम करण्यास शिंदेंची सुरूवात
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. ते केळकर यांना पचलेलं नाही. ते त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. ज्यावेळी ज्येष्ठ नेते निर्णय घेतात. त्यावेळी गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. श्रीकांत शिंदे तरूण खासदार असून त्यांनी हजारो, करोडो रूपयांचा निधी आपल्या मतदारसंघात आणला आहे. यातच तुम्ही देखील मुख्यमंत्री होतात. मग तुम्ही काय केलं होतं. असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…कल्याणमध्ये खरचं भाजप श्रीकांत शिंदेंची ‘गेम’ करू शकते का? राजकीय गणित काय सांगते
दरम्यान, मागील काही दिवसापासून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात वाद सुरू झाला आहे. तेथील स्थानिक नेते एकमेकांवर या मतदारसंघावरून शाब्दिक टोलेबाजी करीत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याच्याही चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“औकातीत राहायचं तु गद्दार आहेस, जर तोंड उघडलं तर भारी पडेल”, राजन विचारे शिंदेंवर संतापले
हेही वाचा…गद्दार सरकारची वर्षपुर्ती येतेय, तुम्ही जरा सांभाळून रहा एकनाथ शिंदे टोला
हेही वाचा…“शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवणार,” गुणरत्ने सदावर्तेंची टिका, नथूराम गोडसेचाही कार्यक्रमात फोटो लावला
हेही वाचा…‘मिशन बारामती’, बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची व्युहरचना
हेही वाचा…“..त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही”, हसन मुश्रीफांचा विरोधकांना टोला