पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनांनंतर कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबीयांच्या बाहेर उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपचा २८ वर्षाचा कसबा पेठ विधानसभा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला. त्यावर महाविकास आघाडीतील काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटूबीयांच्या बाहेर उमेदवारी दिल्याने भाजपवर जोरदार टिका करण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदाच उमेदवारीबाबत भाष्य केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता, त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेर भाजपने उमेदवारी दिली. असं म्हटल्यानंतर आता त्यावर कुणाल टिळक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…आपला शैक्षणिक दर्जा काय, कर्तृत्व काय ? म्हणत काॅंग्रेसने शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, त्यात ‘मामू’ही केला उल्लेख
माझ्या आईने गेली २० वर्ष जे काम केलं होतं. ते काम गेल्या दोन वर्षात कधीही आईचा जनसंपर्क कमी झालेला नव्हतं. त्यामुळे नक्कीच कसब्यात सहानुभूतीची लाट होती. ज्यावेळी भाजप निवडणुकीसाठी उतरली होती. त्यावेळी नागरिकांना वेगळ्या प्रकारे मतदान केल्याचं आपल्याला दिसलं. यातच २० वर्षाचा जनसंपर्क गेल्या दोन वर्षात कमी होत नाही. तसेच आई आजारी होती तरी ती सगळ्या कार्यक्रमांना जात होती. असं कुणाल टिळक यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…““फडणवीसांच्या खासगी निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन, आरोपी ताब्यात, कारण आलं समोर”
हेही वाचा…संजय शिरसाठ यांच्याविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार, म्हणाल्या की, “संजय शिरसाठ या विकृत आमदाराने..”
हेही वाचा…“नेतेच चमडी बचाव पवित्र्यात राहिले तर, रंगा बिल्ला यांच्या तावडीतून लोकशाही कोणीही वाचवू शकणार नाही”
हेही वाचा…“नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है, की..”, सुषमा अंधारेंनी ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत भाजपला हाणला खोचक टोला