मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर देशात एव्हाना राज्यात भाजपविरोधात काॅंग्रेसने आक्रमक पवित्रा घेत जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. यातच राहुल गांधी यांच्यावर भाजपने केलेली कारवाई आगामी निवडणुकांची रणनीती असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“तर उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारतील का?” एकनाथ शिंदेंचा सवाल
सुरज चव्हाण यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा रंगा बिल्ला असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बऱ्याच लोकांना असं वाटतंय राहुल गांधी यांना भाजप घाबरली आहे, म्हणून त्यांच्यावर कार्यवाही करत आहे. मला वाटतंय भाजपला देशभरात एक उदाहरण सेट करायचं आहे. आम्ही राहुल गांधी यांच्यावर कार्यवाही करू शकतो तर बाकीच्यांचं काय ही लढाई जिंकायची असेल तर या हुकूमशाहीच्या विरोधात प्रस्थापीत नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली पाहिजेत. असं सुरज चव्हाण यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा अन् काॅंग्रेसची पक्षाची साथ सोडा”
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, जनता पाठीमागे उभी राहिल नेतेच चमडी बचाव पवित्र्यात राहिले तर रंगा बिल्ला यांच्या तावडीतून संविधान आणि लोकशाही कोणीही वाचवू शकणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय. यातच राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे.
बऱ्याच लोकांना असं वाटतंय राहुल गांधी यांना भाजप घाबरली आहे म्हणून त्यांच्यावर कार्यवाही करत आहे.मला वाटतंय भाजपाला देशभरात एक उदहारण सेट करायचं आहे आम्ही राहुल गांधी यांच्यावर कार्यवाही करू शकतो तर बाकीच्यांचं काय..ही लढाई जिंकायची असेल तर ..
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 28, 2023
Read also
- हेही वाचा…“नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है, की..”, सुषमा अंधारेंनी ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत भाजपला हाणला खोचक टोला
- हेही वाचा…“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा
- हेही वाचा…आपला शैक्षणिक दर्जा काय, कर्तृत्व काय ? म्हणत काॅंग्रेसने शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, त्यात ‘मामू’ही केला उल्लेख