मुंबई : राज्यात एव्हाना देशात काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून काॅंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सावरकरांचा सातत्याने अपमान केल्याने भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली.
हेही वाचा…“गेल्या वर्षी एक कांदा ५० खोक्याला विकला गेला,” उद्धव ठाकरेंचा सुहास कांद्यांवर निशाणा
बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती. तुम्ही राहुल गांधी यांच्या थोबाडात मारणार का ? असं आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे. तसेच राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलून अवमान केला आहे. सावरकर यांच्यावर तुमची बोलण्याची लायकी सुद्दा नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.
हेही वाचा…“काल सधू अन् मधू भेटले, विराट सभा पाहून त्यांनी एकमेकांचे अश्रू पुसले”, राऊतांचा खोचक टोला
एकनाथ शिंदे पुढे बोलतांना म्हणाले की, स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. काव्यापाणाची शिक्षा भोगली आहे. देशभक्तांच्या आणि स्वांतत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वांतत्र्य मिळालेले आहे. राहुल गांधी यांच्यासहित सर्वजण स्वातंत्र्याचा उपभोग घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा अन् काॅंग्रेसची पक्षाची साथ सोडा”
- हेही वाचा…“कुत्रं भुकल्याशिवाय मालक भाकर टाकतं नाही, तसं पडळकरांचं..” राष्ट्रवादीची पडळकरांवर जहरी टिका
- हेही वाचा…“तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिमंत दाखवावी,” भाजपचं चॅलेंज
- हेही वाचा…“महाराष्ट्राला पवार नावाची कीड”, पडळकरांची टिका, “गोप्याच्या बुडाला आग..”मिटकरींचा पलटवार
- हेही वाचा…““हिमंत असेल तर खोक्यांवरून माझ्यासह उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा,” सुहास कांदे यांची मागणी