मुंबई : देशात आणि राज्यात महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. मात्र आता ही लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु, देशाच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सने देशात तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली असून, त्या दृष्टीने राज्यात, राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र असे असले तरीही, राज्यातले निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता त्रस्त आहे.
अजित पवार नाना पटोलेंवर नाराज, संतापून केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाले…
दरम्यान, राज्याला असणारा महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारकडून वेगाने लसीकरण मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, “केंद्राने राज्यांना होणारा लशींचा पुरवठा पुन्हा आपल्या हातात घेतल्यानंतर, २० दिवस उलटून गेले, तरीही राज्याला लशींचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने, आता पुन्हा राज्यात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे आणि महामारीचा सर्वात जास्त फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्याला, त्याच्या दैनंदिन क्षमतेच्या तुलनेत, जवळपास ५ पटीने कमी डोस मिळत आहेत,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजहंस टोपे यांनी दिली आहे.
“ठाकरे सरकारमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे आता बाहेर येऊ लागलंय”
“रविवारपर्यंत राज्याला ३ कोटी ६५ लाख २५ हजार ९९० डोस देण्यात आले आहेत. मात्र, तुटवडा असल्याने क्षमतेच्या तुलनेत कमी डोस केंद्रांना मिळत आहेत. त्यामुळे नाईलाजाने लसीकरण केंद्रांवर आलेल्या नागरिकांना पुन्हा पाठवावे लागत आहे. राज्यात दररोज १५ लाख डोसेस देण्याची क्षमता असताना, केवळ २-३ लाख लोकांनाच डोस दिले जात आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होण्याच्या सृष्टीने, महिन्याला सुमारे ३ कोटी डोसेस मिळणे आवश्यक आहे,” अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
“पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेने शिवसेना-राष्ट्रवादीला अन्नपाणी नको झालंय”
तसेच, “या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यामध्ये महाविकास आघाडीने, १८-४४ वयोगटासाठी राखीव ठेवलेले डोसेस, ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी वळवले होते. मात्र, पुढच्या महिन्यात लस उपलब्ध नसल्याने, अनेकदा लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती. अशाने लसीकरणाचे प्रमाणदेखील कमी होत आहे,” अशी भीती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Read Also :
- “आधी माहिती घ्या, मग आरोप करा,” राष्ट्रवादीचाही नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल
- अमित शाह हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांचे नाव घेऊन भाजपा नेत्यांनी धमक्या देऊ नयेत – मलिक
- “नाना पटोलेंनी जे आहे ते खाजगीत बोलावं, चव्हाट्यावर बोलू नये” शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त
- मोदी सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत; ६ ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!
- “मी बोललो, पण काही चुकीचं बोललो नाही; माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे”