मुंबई : शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना पत्राचाळ घोटळ्यात सध्या ईडीने अटक केलेली आहे. अशा परिस्थितीत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी स्वत: च्या खांद्यावर घेतली आहे. यावरून मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
सामनाच्या मुख्य संपादकाची धुरा उद्धव ठाकरेंकडे.. आता नुसते टोमणे हा सामना नाही हा टोमणा..असं ट्विट करत मनसे नेते गजनन काळे यांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे. शिवसेनेतुन बंडखोरी केलेल्या आमदारांवर आणि शिंदे-फडणवीस सरकारवर शिवसेनेकडून सारखे टोमणे मारले जात आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ही बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. यावरूनच मनसेने शिवसेनेवर टीकी केली आहे.
“महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”
शिवसेना पक्षाचे सामना हे मुखपत्र 1989 मध्ये सुरू झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम पाहिले होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांची उत्तराधिकारी म्हणून नियु्कती करण्यात आली. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व ठाकरे यांनी संपादकपद सोडले आणि त्या जागी पत्नी रश्मी ठाकरेंची नियुक्ती केली.
“राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”
उद्धव ठाकरे यांचे नाव पुन्हा एकदा सामनाचे संपादक म्हणुन लागले आहे. तीन वर्षापूर्वी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाच्या मुख्य संपादकाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकेर यांनी पुन्हा स्व;ची नियुक्ती करून घेतली आहे. शुक्रवारी सामना वृत्तपत्रातील छापील ओळीत उद्धव ठाकरे यांचे नाव संपादक म्हणुन लिहिले होते. सामनाचे संपादकपद आतापर्यत ठाकरे कुटुंबाकडेच राहिले आहे. त्याचवेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे नाव कार्यकारी संपादक म्हणून देण्यात आले होते.
Read also
- “ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील, पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेंच”
- “मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”
- कंगना अन् मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला, मग हा महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय?
- “आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल