मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचं अधिवेशन नवी दिल्लीत पार पाडलं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी नाट्यमय रंगल. अजित पवार यांच्या अगोदर जयंत पाटलांना भाषण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अजित पवार अचानक पणे निघून गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला. यानंतर अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते गजानन काळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे
दादा वॉशरूम ला गेले होते रे, दादा नाराज नाही आहेत… किती बोंबलून सांगणार.. कोणाला पटेल हे की दादा वॉशरूमला गेले हे माहीत होते तरी दादांसाठी थांबावस वाटत नाही यांना… असे कसे चालेल… आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी या चर्चा बंद करा.., असा टोला मनसे नेते गजानन काळे यांनी लगावला आहे.
“पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य
राष्ट्रीय अधिवेशनात मी न बोलल्याने माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीत झाले. या अधिवेशनात अजित पवारांना बोलण्याची संधी दिली नाही अशा बातम्या माध्यमांनी दिल्या. मात्र मी न बोलल्याने माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ लावला. राष्ट्रीय अधिवेशात राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे प्रांताध्यक्ष यांना बोलण्याची संधी असते. त्याठिकाणी मला कोणीही बोलू नका असे सांगितले नाही. वेळे अभावी मी एकटाच नाही तर सुनील तटकरे, वंदना चव्हाण तसेच इतर राज्यातील काही प्रतिनिधींनाही बोलता आले नाही. वस्तुस्थितीवर आधारित बातमी देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या माध्यमांवर आहे, असं अजित पवार म्हणाले.
“मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव
अजित पवार यांना भाषण न झाल्याच्या प्रकरणावर जंयत पाटील म्हणाले की, अजित पवार माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. असं आहे की, कुणी लघूशंकेला गेलं तर त्याचीही बातमी करणं योग्य नाही. शरद पवारांच्या भाषणाला उपस्थित राहता यावं. म्हणून माझं भाषण सुरू असताना अजित पवार लघूशंकेला जाऊन आले, असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं आहे.
Read also
- “हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार
- सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
- तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
- “उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”