मुंबई : शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अंतर आणण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. असं म्हणत अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर निशाणा साधला. आव्हाडांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही. असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी राहत मुंडेंनाच शरद पवारांनी सुनावलं आहे.
हेही वाचा…“धनगर समाजाला फसवलं तसं जरांगे पाटलांना देखील सरकार फसवतंय”
धनंजय मुंडे म्हणाले होते की, जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबियांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले आहे. आज आव्हाड भावनिक असल्याचे दाखवतात. याचे कारण म्हणजे अजित पवार वेगळे झाल्यानंतर शरद पवार गटात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे नसाव्यात आणि एकटे आपणच नेते व्हावे, असा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. शरद पवारांच्या संमतीने भाजपासोबत जाताना जितेंद्र आव्हाड यांनी ५३ आमदारांसह स्वाक्षरी केली होती की नाही ? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. त्यावर आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना सुनावलं.
हेही वाचा…“ठाकरेंना ईडी लावायची सोडून द्या, राम कदमांनी बोलतांना तेवढा डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा”
धनंजय मुंडे यांच्या कितीतरी वर्ष आधीपासून जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत. युवक अध्यक्ष ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. संघटन पातळीवरही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं ? याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही. असे शरद पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचाअजितदादांचं सुप्रिया सुळेंना चॅलेंज..! सुप्रिया सुळे म्हणाल्या की,.. माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर..,
हेही वाचा“मोदींसोबत बैठक संपल्यानंतर दोन ग्लास पाणी, अन् घाम…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ ठाकरेंचा किस्सा
हेही वाचा“मिटकरींचे अनेक महिलांसोबत लफडी, व्हिडीओ पण…,मिटकरींनी जास्त वटवट करू नये, ” शरद पवार गटाचा इशारा
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट कोर्टात, येत्या १९ फेब्रुवारीला होणार महत्वाची सुनावणी
हेही वाचा…लोकसभेपुर्वी कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के, कॉंग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर