मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडणार नाही, त्याठिकाणी निवडणुका घेण्यात हरकत काय? असा सवाल करीत जिल्हानिहाय निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशातच आता मुंबईतील वार्ड रचनावरून काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने मुंबईत सगळ्यांचा विचार करून वार्ड रचना करायला हवी. सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असल्याने तेथील वार्डरचनेत स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमची प्रभाग रचनाची ही मागणी दोनची होती, मात्र प्रभाग रचना ही तीनची करण्यात आली. पुण्यात तसेच मुंबईत आपल्या सोयीनुसार वार्ड रचना होत असेल तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ असा इशारा नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
वार्ड रचनेमध्ये पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला तर मुंबई शिवसेना फायदा होऊ शकतो, म्हणून त्यांनी अशा प्रकारे प्रभाग रचना करण्यात आली आहे का ? या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले की, त्यामुळे आम्ही व्यत्यय आणत आहोत, असंही वक्तव्य केलं आहे. मुंबईत अनेक काळ काॅंग्रेसचा महापौर राहिला आहे. त्यानंतर अनेकदा मुंबई पाण्याखाली डुबली आहे. तसेच ज्ञानव्यापी मशिद वरून राजकारण तापलं आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यावर त्यांनी बोलण्याचं टाळलं.
“दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला
दरम्यान, आगामी काही काळात राज्यात आगामी काही काळात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900, ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग इतक्या साऱ्या निवडणुका एका टप्प्या न घेता त्या 2 किंवा 3 टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी किमान 6 आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे.
Read also:
- OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
- ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील
- “इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”
- काॅंग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठा धक्का! हार्दिक पटेलने दिला राजीनामा
- संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;