मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, “राज्यात जातीयवाद पहिल्यापासून होता. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. या मुद्द्यावरून निवडणुका लढल्या जातात आणि मतदानही होतं. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं, हे याआधी महाराष्ट्रात घडत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद वाढीस लागला,” असे मोठे विधान केले होते.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीच सडेतोड उत्तर दिले असून, पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. आजोबांचं लिखाणचं त्यांना योग्य रस्ता दाखवेल,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी ओबीसी आरक्षणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
“महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” राज ठाकरेंचे मोठे विधान
दुसरीकडे, त्यांच्या या विधानावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील, ”देशातल्या वर्णव्यवस्थेला हजारो वर्षांची परंपरा आहे. राज ठाकरे यांनी त्यांचं वाचन वाढवायला हवं,” असा टोला लगावत, “राष्ट्रवादी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. मात्र, राज ठाकरेंना हे माहीत नसावे किंवा त्यांचा जातीव्यवस्थेचा अभ्यास नसावा, म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले,” असा हल्लाबोल केला होता.
लायकीत राहा! नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करून टाकू, मनसेचा प्रवीण गायकवाडांना इशारा
तसेच, देशात ‘मनुवादी’ वर्णव्यवस्थेने जातीव्यवस्था उभ्या केल्या. त्यामुळे जातीच्या आधारावर अनेक वर्षे देशातल्या लोकांवर अन्याय होत राहिला. छत्रपती शाहू महाराज, म.फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांनी ही जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. राज ठाकरेंना हेही माहीत नसावे. त्यामुळे, त्यांनी केलेले वक्तव्य हे अज्ञानातून केले असावे,” असा निशाणा त्यांनी राज यांच्यावर साधला होता.
Read Also :
- प्रशासकीय यंत्रणांनी दबावाखाली भेट टाळली, पालघर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री भारती पवारांचा आरोप
- “जेवणाला बोलावलं मात्र हात बांधलेले, ही शुद्ध फसवणूक; आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका
- “…तेव्हा मी त्यांना उत्तरे देईन,” भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खासदार भावना गवळींचे किरीट सोमैयांना आव्हान
- “मूर्ख आहात काय? कसल्या अंगार-भंगार घोषणा देतायत, हे शोभतं का?”, पंकजा मुंडेंचा रुद्रावतार
- भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात, मंत्री भागवत कराडांसमोर मुंडे समर्थकांचा गोंधळ