मुंबई : गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आज गुडीपाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. यातच एका बॅनरने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई होणार”, राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा
राज ठाकरे यांचे दादरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. तर असं जर त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
हेही वाचा…गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
दरम्यान, आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टोला हाणला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यावरून टिका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोकांपेक्षा खुर्च्याच जास्त असतात अशी टिका केली. एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेचे नाहीत. अशी टिकाही त्यांनी केली.
Read also
- हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”
- हेही वाचा…कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ”एकनाथ शिंदे” आयोध्या दौऱ्यावर, तारीख ही ठरली
- हेही वाचा…“कसब्यात सध्या रमतोय, मग लोकसभा निवडणुकीचा विचार करू”, रवींद्र धंगेकरांचं सुचक विधान
- हेही वाचा…“खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही”, शिंदे गटातील आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर