पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक दिसत असल्याचे चित्र सध्या आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल पिंपरी चिंचवड भागात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आले असता त्यांच्या गाडीवर चप्पल फेकण्याचा प्रकार घडला आहे. यावरून राज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पिंपरी चिंचवड भागात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच दरम्यान गर्दीतून देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला जात असताना रोहित पवार यांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली असल्याची माहिती समोर येत आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अने संवैधानिक मार्ग आहे. परंतु त्या ऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
10 मार्चपर्यंत कामावर या, अन्यथा…; परिवहनमंत्री परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अशा चिल्लर लोकांना मी महत्त्व देत नाही. आगामी काळात महानगरपालिका निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सध्या राज्यात एकमेकांवर राजकीय चिखलफेक सुरू आहे. आता या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार