पुणे : देशाचा विकासदर केवळ दीड टक्क्यानेच वाढतोय. महागाई डोक्यावरून गेली तरी केंद्र सरकार ढिम्म होत आहे. इंधनाचे दर सामान्यांना परवडेनासे झालेत. बनावट नोटाही पुन्हा वाढल्यात. बेरोजगारीचा प्रश्न जसाच्या तसा आहे. हे कमी म्हणून की काय धर्ममार्तण्ड एकमेकांवर माईक उगारतायत. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानंतर वृत्तवाहिन्यांनी कालपासून वाहिन्यांवर फील गुड फॅक्टरचा बागुलबुवा उभा केला होता, तो तकलादू असल्याचं स्पष्ट होतं. असा घणाघात राष्ट्रवादी काॅंग्रेसने केंद्र सरकारवर केला आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी ज्यापद्धतीने केंद्रातल्या संस्था राबतायत, त्याप्रमाणे आता हवामान खात्याचाही पोपट करण्याची जबाबदारी केंद्राने घेतलेली दिसतेय.आगामी पावसाळ्यात पुराचे नियोजन करताना महसूल, पोलिस, जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
पश्चिम महाराष्ट्रातील पूर नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणाच्या पाण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. त्या अनुषंगाने कर्नाटक राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. वर्षानुवर्षे अन्याय सहन केल्यानंतरही आपला मराठी बांधव झुकलेला नाही. आपल्या मातीत श्वास घेण्याची त्यांची त्यांची जिद्द आजही तीव्र आहे. त्यांचा हा प्रचंड आशावाद आम्हा सर्वांना लढण्याची ताकद देतो. लवकरच समितीच्या पदाधिकाऱ्यांची, चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेईल. आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर व्हावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळावा या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. असंही ते म्हणाले.
लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
दरम्यान, सीमाप्रश्न तज्ञ समितीमार्फत ज्येष्ठ नेते स्व. प्रा. एन. डी. पाटील यांनी भरीव कामकाज करून ठेवले आहे. एन. डी. सर यांच्या नंतर समितीने माझ्यावर विश्वास टाकला आहे. एन.डी. यांच्या कार्याला योग्य आकार देऊन आपल्या मराठी भाषिक बांधवांना न्याय मिळावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. तसेच पूर नियंत्रणासाठी सांगली जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून पावसाचा अंदाज पाहून खबरदारीची पावले उचलली जातील, असेही त्यांनी आश्वस्त केले सीमावासीयांच्या गेल्या तीन पिढ्या महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करत आहेत. हा प्रश्न फक्त भाषेच्या अस्मितेचा नाही तर तेथे राहणाऱ्या आणि कर्नाटक सरकारचा जाच सहन करणाऱ्या लोकांच्या अस्तित्वाचा आहे, देशाला स्वातंत्र्य मिळूनही वैचारिक पारतंत्र्यात जगणाऱ्या नागरिकांचा प्रश्न आहे. असंही ते म्हणाले.
देशाचा विकासदर केवळ दीड टक्क्यानेच वाढतोय. महागाई डोक्यावरून गेली तरी केंद्र सरकार ढिम्म होतं. इंधनाचे दर सामान्यांना परवडेनासे झालेत. बनावट नोटाही पुन्हा वाढल्यात. बेरोजगारीचा प्रश्न जसाच्या तसा आहे. हे कमी म्हणून की काय धर्ममार्तण्ड एकमेकांवर माईक उगारतायत.#IMD #Mansoon pic.twitter.com/ihBCppNvsF
— NCP (@NCPspeaks) June 1, 2022
Read also:
- “केंद्र सरकारने राज्याला 14 कोटी दिलेत, आता इंधनावरील दर कमी करावा”; भाजप नेत्याची मागणी
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
- “खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला