मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यातच आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही”, राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने राजकारणात काहुल माजलं
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. यात कलाकार देखील अंतर्गत आहेत, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही. तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ. पण हे सगळं स्क्रिप्टेड होतं असं मी म्हटलं नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…Breaking: शरद पवारांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस समितीचा महत्त्वाचा निर्णय! कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
यातच मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केलेल्या आंदोलकांशी भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यावर स्वत:च बारसुला प्रकल्प व्हावा. असं पत्र लिहियाचं आणि स्वत: तिथं जाऊन लोकांना चिथावणीखोर वक्तव्य करायची. हा उद्धव ठाकरे यांचा विकास विरोधी चेहरा समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांना समाजाशी, विकासाशी देणं घेणं नाही. त्यांना निव्वळ राजकारण करायचं. त्यासाठी दुसऱ्यांचे खांदे वापरायचे आहेत. आता त्यांना बारसुच्या लोकांचा खांदा मिळाला आहे. असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! पडद्यामागचं राजकारण, रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, एकच खळबळ
हेही वाचा…“मला विचार करण्यासाठी वेळ हवाय”, निवड समितीच्या प्रस्तावावर पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
हेही वाचा…“समितीने राजीनामा फेटाळ्यानंतर फटाके, मिठाई वाटत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष”, शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष ?