मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काही दिवसात लागणार आहे. त्याआधी राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली घडतांना दिसत आहेत. आता शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यातच आता राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी बातमी समोर आली आहे.
हेही वाचा…Breaking: शरद पवारांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस समितीचा महत्त्वाचा निर्णय! कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २ मे रोजी पहाटे भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी न्युज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा या वृत्त संस्थेने दिली आहे. यावरून आता आता राज्यात बदलाचे वारे वेगाने फिरत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का ? अशा चर्चा देखील रंगल्या आहेत.
हेही वाचा…“मी पुन्हा येईन, तो कसा येतो, ते तुम्हाला….”, तापलेल्या राजकारणात फडणवीसांचं सुचक विधान
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील निकाल येत्या पाच ते सहा दिवसात लागण्याची शक्यता आहे. या निकालानंतर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळणार असून सत्ता राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी भाजपसोबत हातमिळवळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने शरद पवारांनी देखील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”
राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ह्या भेटी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मला विचार करण्यासाठी वेळ हवाय”, निवड समितीच्या प्रस्तावावर पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
हेही वाचा…“समितीने राजीनामा फेटाळ्यानंतर फटाके, मिठाई वाटत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष”, शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष ?
हेही वाचा…“राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही”, राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने राजकारणात काहुल माजलं