मुंबई – संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला.
दगडूशेठ मंदिराच्या बाहेरूनच पवारांनी होत जोडले; म्हणाले की, आज नॉनवेज खाल्लं असल्याने..;
संभाजीराजे छत्रपती यांनी काल पत्रकार परिषद घेत आपल्या माघारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत त्यांनी शब्द पाळला नसल्याची टीका केली आहे. त्यांच्या या उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राऊत रविवारी कोल्हापूर दौरा केला. या वेळी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणावर त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आम्ही संभाजीराजे यांची उमेदवारी रद्द केली नाही तर त्यांना आमची भूमिका न पटल्याने ही उमेदवारी बाजूला पडली आहे असे सांग त राऊत म्हणाले की, ही उमेदवारी देण्यापूर्वी पक्षाने त्यांना काही गोष्टींची स्पष्ट कल्पना दिलेली होती. हा विषय महाविकास आघाडी, शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील आहे. यावरून त्यांची कुणी फसवणूक करण्याचा प्रश्नच नाही. राजे महाराजे यांना राजकारणात करियर करायचं असेल तर त्यांनाही कोणत्या तरी एका पक्षाबरोबर निष्ठेने राहावे लागते, असा टोलाही त्यांनी संभाजीराजे यांचे नाव न घेता लगावला.
दरम्यान, या रद्द झालेल्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीवर छत्रपती घराण्याचा अपमान केल्याची टीका करणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरही राऊत यांनी या वेळी टीका केली. यावरून महाविकास आघाडी आणि छत्रपती घराणे, मराठा समाज अशी दरी निर्माण केली जात असल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, हा शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील विषय आहे. त्यांना उमेदवारी का दिली नाही याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. मात्र यातून सुरू झालेल्या विविध मतमतांतरांचा फायदा घेत भाजपाने राजकारण करू नये, असा सल्ला राऊत यांनी दिला.
“आमची तेव्हाही इच्छा होती, अन् ती आजही आहे”; बाळासाहेब थोरांतांचं संभाजी राजेंबाबत वक्तव्य
निलेश राणेंनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच ट्विटरवरुन निशाणा साधला. या ट्विटमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करतानाच छत्रपतींच्या घराण्याला एकमत दाखवण्याचा सल्ला निलेश राणेंनी दिलाय. “किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संजय राऊतांसारख्या फडतूस माणसाला बोलण्याची संधी देऊ नये. तुम्हीच एकमत दाखवलं नाही तर समाज तुमच्याकडून काय बोध घेईल? परत परत बोलून लाथ मारलेल्या खासदारकीला आपण महत्त्व देताय,” असं निलेश राणेंनी म्हटलं
किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संज्या सारख्या फडतूस माणसाला बोलण्याची संधी देऊ नये. तुम्हीच एकमत दाखवलं नाही तर समाज तुमच्याकडून काय बोध घेईल?? परत परत बोलून लाथ मारलेल्या खासदारकीला आपण महत्त्व देताय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 29, 2022
Read also:
- राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..
- “तर मग घोडेबाजारांचा प्रश्न निर्माण होणार नाही” ; राज्यसभेच्या निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला फार्म्युला
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा