मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात सर्वात पाचमध्ये होते. त्यानंतर हळूहळू ते पहिल्या क्रमांकावर जाण्याच्या गतीत होते. परंतु त्यानंतर हे सरकार पाडण्यात आलं. महाराष्ट्राची प्रगती, विकास काही लोकांना बघवत नव्हतं. त्यामुळेच हे सरकार पाडण्यात आलं. अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर केली. तसेच एकनाथ शिंदे यांना कुणीच आपला मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. असा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर लगावला.
हेही वाचा..““‘एक अकेला सबपे भारी’ म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले”
शिवसेना आणि धनुष्यबाण यासंदर्भाच्या याचिकांवर बोलतांना ते म्हणाले की, तुम्ही आनंदत्सोव साजरा करण्याच्या तयारीत लागा. अशा प्रकारची ही दोन लोकं विधान करत असतील तर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणुक आयोगाला ह्यांनी विकत घेतलं आहे का ? असा सवालही राऊतांनी केला. त्यामुळेच आम्ही लोकांना सावध केलं आहे. अन् निकाल लागण्याच्या आधीच सांगितलं आहे की, आम्हीच जिंकतोय. अशीही त्यांनी टिप्पणी केली.
हेही वाचा..““गुजरात काय उद्या अमेठीलाही आपला प्रकल्प गेला तर त्याचा विरोध करेन”, सत्यजीत तांबे
दरम्यान, उद्या निवडणुक आयोगासमोर धनुष्यबाण आणि शिवसेनेसंदर्भात सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून निवडणुक आयोगाला लेखी उत्तर देण्यात आलं आहे. याआधी दोन्ही गटाच्या वकिलांनी निवडणुक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे उद्या निवडणुक आयोग काय निकाल देणार ? याकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?
- हेही वाचा..“ठाण्यात राष्ट्रवादीला मोठ खिंडार, 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- हेही वाचा..““गुलाल आपलाच..! सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा”, अजित पवार
- हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
- हेही वाचा..“महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..”जाता जाता कोश्यारींचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान