मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्पतीने राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. त्याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अडीच वर्षाची कारकिर्द खुपच वादग्रस्त ठरली आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यातच त्यांनी जाता जाता पुन्हा एकदा महाराष्ट्राबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
महाराष्ट्राचे लोक कसे आहेत? असं मला कुणीतरी विचारलं. मी म्हणालो ते आमच्या पहाडी लोकांसारखेच आहेत. चांगले लोक आहेत, शहरात असेल गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद असतील पण ओव्हरऑल चांगली लोक आहेत. तुमच्याकडे देशपांडे आहेत, तर आमच्याकडे पांडे आहेत, तुमच्याकडे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहे. असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा ते टिकेचे धनी होण्याची शक्यता आहे. ते नवी मुंबईतील उत्तराखंड प्रीमिअर लीगच्या कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान
यातच राज्यपालांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर संजय राऊतांनी खोचक टिप्पणी केली आहे. त्यांनी नव्या राज्यपालांबाबत भाष्यही केलं आहे. महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे. राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राजभवनाचे भाजप कार्यालय करू नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात? राज्याने कटू अनुभव घेतला आहे. राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले. फक्त भाजपला नाही याचे भान ठेवले तरी पुरे असाही टोला त्यांनी हाणला.
हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा
दरम्यान, महाराष्ट्रात अत्यंत वादग्रस्त ठरलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राज्यपाल पदाचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने रविवारी 13 राज्यांतील राज्यपाल आणि नायब राज्यपाल बदलले आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली आहे. नवे राज्यपाल रमेश बैस यांचं स्वागत तर मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे.
Read also
- हेही वाचा..““‘एक अकेला सबपे भारी’ म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले”
- हेही वाचा..““गुजरात काय उद्या अमेठीलाही आपला प्रकल्प गेला तर त्याचा विरोध करेन”, सत्यजीत तांबे
- हेही वाचा..““काॅंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही, भाजपकडून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न,” नाना पटोले
- हेही वाचा..“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल,” मोदींचा मुंबईत हल्लाबोल
- हेही वाचा..आता माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी, राहुल कलाटे सत्ताधारी आणि विरोधकांचा घाम फोडणार?