पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांचा महाराष्ट्र दौऱ्याचे प्रमाण वाढलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांचा हा दुसऱ्यांचा मुंबई दौरा आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री अमित शहा देखील येत्या 17 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता केंद्रीय मंत्र्यांनी दखल देण्यास सुरूवात केल्याने त्याची एकच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य
नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत मुंबई दौऱ्याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, की 10 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष आहे, खास करून संपर्क-दळणवळ व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आहे. मुंबई-सोलापुर, आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन्सचा शुभारंभ होणार आहे. सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचेही राष्ट्रार्पण होणार आहे. असं त्यात त्यांनी नमुद केलं आहे.
हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
तर दुसरीकडे अमित शहा 17, 18, 19 या तारखेला महाराष्ट्रात असणार आहे. यामध्ये ते 17 तारखेला नागपुर येथील संघाच्या मुख्य कार्यालयात भेट देणार आहे. त्यानंतर ते कोल्हापुर आणि पुण्यात येणार असून ते शिवसृष्टीच्या प्रथम चरणाचा त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यातच पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकाही लागल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून अमित शहांच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात
यातच कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणुक ही 2024 मधील निवडणुकीच्या लढाईचा प्रारंभ आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी भाजपकडून चांगलीच मेहनत घेतली जात आहे. यातच आज सांयकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असून त्यांच्या स्वागताची तयारीही जोरदार करण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना राजकीय पक्षांकडून विनंती, भाजप, आघाडीचे नेते लागला कामाला
- हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर कलाट्यांच्या भेटीला, माघार घेणार की थेट लढणार ?
- हेही वाचा..“मोदी मुंबईत आले अन् आख्खा देश लावला तरी मुंबई महापालिका भाजप जिंकू शकत नाही”
- हेही वाचा..“काॅंग्रेस की संभाजी ब्रिगेड? कसब्यावरून उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “